मुंबई – बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी सर्व आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने तब्बल २८ वर्षानंतर हा निकाल दिला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, न्यायालयाच्या निर्णयाचे शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत. आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या सर्वांचीच मुक्तता झाली आहे. न्यायालयाने हा कोणताही कट नसल्याचे स्पष्ट केले आहे. हाच निर्णय अपेक्षित होता.
आता आपल्याला तो भाग विसरला पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे. जर बाबरी पडली नसती तर आज राम मंदिराचे भूमिपूजन झाले तो दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
I and my party Shiv Sena, welcome the judgment and congratulate Advani ji, Murli Manohar ji, Uma Bharti ji & the people who have been acquitted in the case: Sanjay Raut, Shiv Sena, on the #BabriMasjidDemolitionVerdict https://t.co/WOQAtoYkXQ
— ANI (@ANI) September 30, 2020
दरम्यान, बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी तब्बल २००० पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. यामध्ये बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवला. तसेच आरोपींविरोधात कोणताही पुरेसे पुरावे नसल्याचे सांगण्यात आले आहे.