पुणे – “आयसीएसई’ मंडळामार्फत सहा विषय घेऊन इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे केवळ ग्रुप 1 व ग्रुप 2 मधील कोणत्याही पाच विषयांचे सरासरी गुण इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या राज्य मंडळाशी संलग्न महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांच्या गुणांबाबत सुधारित आदेश देण्यात आले आहेत. आयसीएसई मंडळामार्फत सात विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट फाइव्हचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांचे ग्रुप 1 व 2 मधील सहा विषयांपैकी कोणतेही पाच विषयांचे बेस्ट फाइव्ह गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप 3 मधील गुण विचारात घेण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांचे ग्रुप 1, 2, 3 मधील सात विषयांची सरासरी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.