नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे महासंचालक बलराम भार्गव यांनी, करोना महासाथ असल्याने यावर्षी तरी सणउत्सव सध्या पद्धतीने साजरे करा, अनावश्यक प्रवास टाळा अशी कळकळीची विनंती केली आहे. सणासुदीच्या तोंडावर करोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता त्यांनी ही विनंती केली.
नागरिकांनी करोना विषाणू सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करूनच सणउत्सव साजरे करावेत, गर्दी टाळावी असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. “यावर्षी तरी अनावश्यक प्रवास टाळणे व सणउत्सव सध्या पद्धतीने साजरे करणे विवेकी ठरेल” असं भार्गव म्हणाले.
“सणउत्सव तोंडावर असून आम्ही सर्वांना गर्दी टाळण्याचे, सुरक्षित अंतर ठेवण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन करतो. करोनासंबंधित सुरक्षिततेचे नियम पळून सण साजरे करा” असं देखील भूषण म्हणाले.
दरम्यान, देशातील सणउत्सवांच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे व केंद्र शासित प्रदेशांना सणउत्सवांनंतर विषाणू संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट पाहता फाजील आत्मविश्वास न बाळगू नका असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे.
देशामध्ये सध्या २,७७,०२० सक्रिय बाधित असून ही गेल्या १९५ दिवसांमधील सक्रिय बाधितांची सर्वात कमी संख्या आहे.