लंडन – दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे मनौधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाची बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आज ओव्हल मैदानावर गाठ पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपराजित्व राखण्याकरिता भारताकरिता ही लढत महत्वाची आहे. या लढतीआधी विराट कोहलीने विजयी वाटचाल कायम राखणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
विराट कोहली प्रतिक्रिया देताना म्हटला की, “ऑस्ट्रेलियाबरोबर आमची कामगिरी फारशी चांगली नसली तरी या गोष्टी आता इतिहासात जमा झाल्या आहेत. आफ्रिकेबरोबरच्या लढतीत विजय मिळविल्यामुळे आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढला आहे. कांगारूवर मात करण्यास आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. शेवटपर्यंत चिवट झुंज देण्याची आमच्याकडे क्षमता आहे”.