मुंबई – इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संघाकडून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची उत्सुकता संपली आहे.
गेल्या काही काळापासून चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात बरीच चुरस निर्माण झाली असून या क्रमांकावर अनेक पर्याय संघ व्यवस्थापनाने वापरून पाहिले असून यासाठी अंबाती रायडू, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत यांचा पर्याय वापरून पाहिला होता. मात्र या क्रमांकावर अंबाती रायडूपेक्षा विजय शंकरला संधी देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असून पर्यायी गोलंदाज म्हणुन त्यचा वापर केला जावू शकतो म्हणुन त्याला संघात स्थान मिळाल्याचेही बोलले जात आहे.