नवी दिल्ली – ३० मे पासून क्रिकेटची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून विश्वचषक स्पर्धा सुरु होऊन तब्ब्ल आठवड्याभराने भारतीय संघ आज पहिल्यांदाच मैदानात उतराला आहे. सलामीच्या सामन्यामध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भारताने दक्षिण आफिकेच्या ५ खेळाडूंना तंबूत धाडले असून दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर ८९ धावा जमा झाल्या आहेत.
दरम्यान, भारतीय संघ आज विश्वचषक स्पर्धेत पहिलाच सामना खेळत असल्याने देशभरातील क्रिकेट फॅन्स भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत. सलामीच्या सामन्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे पंतप्रधानांनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना, “भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या प्रवासाला आज सुरुवात केली. सर्व संघाला खूप खूप शुभेच्छा! मला आशा आहे की या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट रसिकांना दर्जेदार खेळाचा आनंद घेता येईल तसेच स्पर्धेमध्ये संघांकडून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्यात येईल. खेळ जिंका पण खेळाबरोबर हृदयही जिंका.” असा संदेश दिला आहे.
As #TeamIndia begins it’s #CWC19 journey today, best wishes to the entire Team.
May this tournament witness good cricket and celebrate the spirit of sportsmanship.
खेल भी जीतो और दिल भी ! #INDvSA
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2019