ऑकलंड – भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हीने आपल्या कारकीर्दीत एक मैलाचा दगड पार केला आहे. तीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 250 बळींचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारी झुलन जागतिक क्रिकेटमधील पहिलीच महिला क्रिकेटपटू बनली असून भारताचीही पहिलीच खेळाडू ठरली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये झुलनच्या स्पर्धक
– कॅथरीन लॉरेन, ऑस्ट्रेलिया – 180
– अनीसा महंमद, वेस्ट इंडिज -180
– शबनम इस्माइल, दक्षिण आफ्रिका – 168
– कॅथरीन ब्रंट, इंग्लंड – 164
महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढतीत झुलनने इंग्लंडची सलामीवीर फलंदाज टॅमी बुयमोंटला बाद केले तेव्हा तीने हा स्वप्नवत पल्ला गाठला. महिला क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. झूलनचा हा 199 वा सामना होता व त्यात तीने या विक्रमाला गवसणी घातली.