हॅमिल्टन – न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची वेस्ट इंडीजशी लढत होत आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीतील हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जर विजय प्राप्त केला तरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहणार आहे.
⏰ 𝗛𝗮𝘃𝗲 𝘆𝗼𝘂 𝘀𝗲𝘁 𝘆𝗼𝘂𝗿 𝗮𝗹𝗮𝗿𝗺𝘀 𝘆𝗲𝘁❓#TeamIndia will take on the West Indies in their 3⃣rd #CWC22 clash at the Seddon Park, Hamilton tomorrow. 👍 👍 #WIvIND
Drop in your messages in the comments below 🔽 & wish our team. pic.twitter.com/2oMXFBCxU7
— BCCI Women (@BCCIWomen) March 11, 2022
भारताच्या महिला संघाने या स्पर्धेत सलामीच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला यजमान न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपूष्टात येणार आहे. स्पर्धेचा तसेच वेस्ट इंडीजविरुद्धचा इतिहास भारतीय संघाच्या बाजूने आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध या स्पर्धेच्या इतिहासात आजवर झालेल्या सहा सामन्याच भारतीय संघच वरचढ ठरला असल्याने या सामन्यातही भारतीय संघाचेच पारडे जड राहणार आहे.