केपटाऊन -दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पंचगिरीला उद्देशून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, आर. अश्विन व लोकेश राहुल यांनी स्टम्प माइकमध्ये बोलून टीका केली होती. हे कृत्य नियमांचे उल्लंघन नसले तरीही भविष्यात खेळाडूंनी हे वर्तन करू नये, असा इशारा आयसीसीने दिला आहे.
केपटाऊनला झालेल्या या कसोटी सामन्यात डीआरएसमधून घडलेल्या वादाबाबत भारतीय संघाला दंड लावण्यात आलेला नाही. आयसीसीने भारतीय संघाला तरी संघावर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. केपटाऊन कसोटीत अश्विनच्या चेंडूवर डीन एल्गरला मैदानावर पंचांनी पायचीत बाद केले.
एल्गरने मात्र या निर्णयावर डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू स्टंपवरून जात होता आणि या कारणास्तव मैदानावरील पंच मॉरिस इरास्मस त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. या निर्णयावर भारतीय खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.