इंग्लंड : मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांचे आयोजन करण्यास अधिकाधिक दिवस मिळावेत यासाठी आयसीसीकडून १४३ वर्षांची परंपरा असणा-या कसोटीच्या ढाच्यात बदल करण्याचा विचार आयसीसी करत आहे. या प्रस्तावाला इंग्लंडचा माजी गोलंदाज इयन बोथमने देखील विरोध दर्शविला आहे.
बोथम म्हणतो की, ‘ पाच दिवसाचे कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. त्यातच तुमचे कौशल्य, तुमची क्षमता, तुमची ताकद यांची कसोटी लागते. अस्सल खेळाडूंचे ते अस्सल क्रिकेट आहे.’
Well played England…Such a good idea to end 5day test cricket….full house watching cricket at its best !! Leave the flag ship of cricket alone it’s a real test of character, skill,guts,stamina & ability…it’s real cricket for real players !!! Leave it Alone !!!!!!
— BeefyBotham (@BeefyBotham) January 7, 2020
बोथम पुढे म्हणतो की, ‘ आयसीसीने चार दिवसांचे कसोटी सामने खेळविण्याचा निर्णय पटलेला नाही. कसोटी सामन्याची रंगतच यामुळे निघून जाईल. या निर्णयावर चर्चा व्हावी व सर्व सलंग्न देशांच्या मंडळांचे मत विचारत घेतले जावे.’
याआधी, संदीप पाटील,सचिन तेंडूलकर, रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर, विराट कोहली, नॅथन लायन यांनीही चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटला विरोध दर्शविला आहे.