मुंबई : ‘भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयएएस, आयपीएस अधिकार्यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात, असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. हे नियोजित कट कारस्थान असल्याचं मलिक यांनी म्हटलं.
नवाब मलिक म्हणाले की, सरकारवर आरोप करण्यापूर्वी काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बैठका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्या होत्या. भाजपकडून हे कटकारस्थान ठरवून केले जात आहे. एवढेच नाही तर, वेळ आली की, आरोप करण्यापूर्वी कोण-कोणते आयपीएस अधिकारी आणि विरोधीपक्ष नेते कुठे आणि कसे भेटले, याचीही माहिती देऊ, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान देशातील संस्थाचा राजकीय वापर होत असल्याचंही आता लपून राहिलं नाही. आता ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आम्हाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला जनता निश्चितच उत्तर देईल, असंही त्यांनी म्हटलं. दुसरीकडे भाजपने हे आरोप फेटाळून लावलेत.