चंद्रपूर : पूजा चव्हाण आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणात विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. त्यानंतर संजय राठोड प्रकरणात विरोधी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली, प्रकरणाचा गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांचा राजीनामा घेतल्याची माहिती आहे. मात्र संजय राठोड मीडिया ट्रायलचे बळी ठरलेत असं विधान काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, परंतु भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली, ते योग्य केले. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव तरूणीच्या आत्महत्येशी जोडले गेले आहे, त्यामुळे शिवसेनेची आणि सरकारची नामुष्की होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एकप्रकारे इतरांना कडक इशारा दिल्याचंही बोलले जात आहे.