मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणा केल्या होत्या. त्याच घोषणांना आज सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांनी “सचिन वाझेचे खोके, एकदम ओके, लवासाचे खोके, बारामती ओके”, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर झालेल्या राड्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना उत्तर दिल आहे.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतले असलेतरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो”, असं केसरकर म्हणाले.