गेले आठ वर्षांपासून स्वखर्चाने आळंदी ते पंढरपूर मोफत वारकऱ्यांना पाणी पुरवठा करणारे रामप्रसाद चौरे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाच्या वाडीचे आहेत. आमच्या भागात पाऊस पडला नाही. आम्हांला दुष्काळ आहे.
मात्र, माझ्या वारकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करू देणार नाही. यासाठी स्वतःच व कधी भाड्याने टँकर घेऊन चौरे हे आळंदी ते पंढरपूर मोफत पाणी पुरवठा करत आहेत. वारकरी जेव्हा पाणी पिऊन तृप्त होतात तेव्हा खूप समाधान वाटते. यातच माझा विठ्ठल असल्याची भावना त्यांनी दै. प्रभातशी बोलतांना व्यक्त केल्या..