मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पाडवा मेळावा घेतला. जनतेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबद्दल गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचे कौतुक केले.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात हा मेळावा पार पडला. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे म्हणाले,’मला जावेद अख्तर आणि आणखी बरेच लोक हवे आहेत. मला भारतीय मुस्लिम हवे आहेत जे पाकिस्तानच्या विरोधात बोलतील आणि त्यांना आमची ताकद सांगतील. जावेद अख्तर यांनी असे केले आहे आणि मला त्यांच्यासारखे मुस्लिम हवा आहे.’
तत्पूर्वी जावेद अख्तर पाकिस्थानातील एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की,’हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तचे नव्हते. ते अजूनही तुमच्या पाकिस्थान देशात अस्तित्वात आहेत, त्यामुळे कोणत्याही भारतीयाने त्याबद्दल तक्रार केल्यास तुम्ही नाराज होऊ नये. भारताने यापूर्वी अनेक पाकिस्तानी कलाकारांचे यजमानपद भूषवले आहे, तर पाकिस्तानने लता मंगेशकर यांना कधीही होस्ट केले नाही.’ असेही ते म्हणाले
दरम्यान, हिंदुत्ववादी नेते राज ठाकरे यांनी जावेद कौतुक केले आहे. तर आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, “आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधून लुटले आणि महाराष्ट्रात नेले…’ असं म्हणत टीका केली आहे.