नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा कायद्याला सुरू असलेल्या विरोधाने देशात अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतले आहे. आंदोलनाच्या नावाखाली हिंसक झालेल्या जमावाचा एक व्हिडीओ गुजरातमधील अहमदामधून समोर आला आहे. तर हिंसाचाराची धग देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले.
— Rajinikanth (@rajinikanth) December 19, 2019
याच पार्श्वभूमीवर दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विटवरुन चिंता व्यक्त केली आहे. रजनीकांत यांनी ट्विट केले आहे की,’“सध्या सुरु असणारी हिंसा पाहून खूप दु:ख होतं,एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हिंसा आणि दंगल हे माध्यम असू नये. मी भारतीयांना एकजुटीने राहण्याची विनंती करतो. देशाची सुरक्षा आणि हित लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.’