मेलबर्न – ऋषभ पंतला मी मीठी मारली नाही. अतीउत्साहाच्या भरात मी ते ट्विट केले, असे स्पष्टीकरण भारतीय संघातील खेळाडूंचे हॉटेलमधील बिल भरलेल्या नवलदीप सिंग या व्यक्तीने दिले आहे.
भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गील, नवदीप सैनी व पृथ्वी शॉ हे चॅडस्टोन हॉटेलमध्ये गेले असताना नवलदीप सिंग या चाहत्याचे त्यांचे बिल भरले होते. खेळाडूंनी बायोबबल नियमाचा भंग केल्याचे सांगितले गेले व या खेळाडूंना आता विलगीकरणात राहावे लागत असून त्यांना भारतीय संघासह प्रवास करता येणार नसल्याचेही सांगितले जात आहे. या हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी सोशस डीस्टन्सिंगच्या नियमालाही हरताळ फासला गेल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याबाबत बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र, नवलदीपसिंग याने याबाबत स्पष्टीकरण करताना मी पंतला आलिंगन दिले नाही केवळ अतीउत्साहाच्या भारत मी ते ट्विट केले असेही त्याने सांगितले आहे.
मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने खेळाडूंसाठी कीही नियम तयार करण्यात आले होते व त्यांनी याच नियमांचा भेग केल्याचेही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. अर्थात, खेळाडूंना ओपन एरीना हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी होती मात्र, त्यांनी बंदिस्त हॉटेलमध्ये जाऊन नियमभंग केल्याचे सांगितले जात आहे. खेळाडूंच्या या वर्तनाची तसेच अन्य सर्व गोष्टींची तपासणी बीसीसीआय करणार असून त्यानंतरच तिसऱ्या कसोटीबाबतचे चित्र तसेच त्यात कोण खेळू शकते याबाबत स्पष्ट होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांचा खोडसाळपणा
भारतीय क्रिकेटपटूंनी कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, असा खुलासा बीसीसीआयने केला आहे. तसेच हा सगळा प्रकार केवळ भारतीय संघाचे मनोधैर्य खालावण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचेही बीसीसीआयने सांगितले आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी नियमांचे काटेकोर पालन केले असून बीसीसीआय या खेळाडूंच्या पाठीशी आहे, असेही जाहीर केले आहे.