मुंबई – सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाने आनंदोत्सव साजरा केला असला तरी ठाकरे गटाने या निर्णयावरुन संताप व्यक्त करताना सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतानाच निर्णय घेतल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे.
उद्धव ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. उध्दव ठाकरेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर भाजपसह शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी टिकास्त्र सोडलं होतं. परंतु आता भाजपचे दिग्गज नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोग बरखास्त करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
भाजपाचे भाजपचे दिग्गज नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेली निवडणूक आयुक्तांबद्दलची मागणी योग्य असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे.
I support Uddhav Thakre demand to sack the CEC since his tenure earlier in Finance Ministry was dubious
— Subramanian Swamy (@Swamy39) February 21, 2023
त्यांनी म्हटले आहे की, “निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची हकालपट्टी करावी या उद्धव ठाकरेंच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. यापूर्वी त्यांचा (निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचा) अर्थमंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता,” असं स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
#Pathaan : शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमानं रचला इतिहास; 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा केला पार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून राज्यात राजकीय वादंग पेटलेलं असताना सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.