मुंबई: आज बजहबचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्या नंतर सभागृहात फडणवीसांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानावरून टोला लगावाला आहे.
पाटील म्हणाले की, “विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपानं आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्षनेते असतील असे मी जाहीर करतो,”
त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी फडणवीस यांची वोरोधीपक्षनेतेपदी निवड केली. देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते म्हणून अभिनंदन करताना जयंत पाटील म्हणाले, “फडणवीसांनी अनेक वर्ष विधानसभेत काम केलं आहे. त्यांनी काय मुद्देसुद भाषणं केली. वॉर्ड अध्यक्षपदापासून त्यांची कारकिर्द सुरू झाली. त्यांनतर त्यांनी प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील काम केलं. त्या कामकाजाचा त्यांना गेल्या पाच वर्षात खुप फायदा झाला. प्रत्येक जण काम करतो पण एवढी प्रसिद्धी केली नाही,” असा तोही पाटील यांनी लगावला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, असे वारंवार सांगण्यात येत होत. या विधानावरून जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला. “मी आमच्या मतदारसंघात भाषण करताना म्हणायचो की मी निवडून आल्यानंतर सदनात पहिल्या रांगेत बसेल. कोणत्या बाजूला बसेल ते माहिती नाही पण पहिल्या रांगेत नक्की बसेन. त्यांच्या (फडणवीस) भाषणात ते म्हणाले परत येईन, सदनात कविता देखील मांडत त्यांनी मी परत येईन असं सांगितलं. पण, त्यांनी मी कुठे बसेन सांगितलं नव्हतं. त्यामुळे ते आता परत आले आहेत, तेही विरोधी पक्षनेते म्हणून,”