मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यासह एकूण सहा प्रकरणाच्या तपासातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना हटवण्यात आले असून संजय सिंह आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत असे वृत्त आहे. त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
I've not been removed from investigation. It was my writ petition in court that the matter be probed by a central agency. So Aryan case & Sameer Khan case are being probed by Delhi NCB's SIT. It's a coordination b/w NCB teams of Delhi & Mumbai:NCB Zonal Dir Sameer Wankhede to ANI pic.twitter.com/Hf7ZrjwVex
— ANI (@ANI) November 5, 2021
“मला चौकशीतून काढून टाकण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे. हे दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीम्स दरम्यानचा परस्पर समन्वय आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया –
“समीर वानखेडेला आर्यन खान केससह ५ प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं. अशी २६ प्रकरण आहेत ज्यांचा योग्य तपास करणं गरजेचं आहे. ही एक चांगली सुरुवात आहे. सिस्टीम साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”