मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी महाविकास आघाडीत आरोपांच्या फेऱ्या झडत आहेत. त्यातच फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेला पेनड्राईव्ह आणि केलेले आरोप यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी फडणवीसांना फोन टॅपिंगवरून सवाल केला.
फडणवीसांनी स्टिंग ऑपरेशनचा दा करत राज ठाकरेंना एक पेन ड्राईव्ह पाठवला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह आणला. आज दुसरा पेन ड्राईव्ह आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, अशी विचारणा वळसे-पाटील यांनी केली.
दरम्यान पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे कोणाकोणाचे फोन टॅप केले, त्याची यादीच वळसे पाटील यांनी वाचून दाखवली. २०१५ ते २०१९ या कालावधीत नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे, आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले. फोन टॅप करण्यात आलेले बरेच नेते त्यावेळी भाजपमध्ये होते. खोट्या नावांनी त्यांचे फोन टॅप झाले. विरोधकांचे फोन टॅप करणं कदाचित समजून घेता आलं असतं. पण स्वत:च्या नेत्यांचे फोन टॅप का केले नाही हे समजत नाही, असा टोला गृहमंत्र्यांनी लगावला.