मुंबई: आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, शरद पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासंबंधी विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही”
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात शरद पवार म्हणाले, “एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेत नाही,”