मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा 2 एप्रिल रोजी गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर मलायका अरोराला उपचारासाठी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका एका शूटवरून पुण्याहून मुंबईला परत येताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. आणि ही घटना घडली.
या अपघातात मलायका किरकोळ दुखापत झाली. आता तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तेव्हापासून ती घरीच आराम करत आहे. पण या प्रसंगानंतर मलायकाने काही दिवस सोशल मिडीयाकडे जणू पाठच फिरवली होती. मात्र, पुन्हा एकदा मालयका आपल्या कामावर रुजू झाली आहे.
दरम्यान, या प्रसंगातून मलायका अद्यापही बाहेर निघालेली नाही. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अभिनेत्री मलायका अरोराने याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी मलायका म्हणाली की…, “माझ्या आयुष्यातील तो सर्वात भयानक दिवस होता. हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. अपघातामुळे मला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून हळूहळू मी बाहेर येत आहे. आपण सिनेमामध्ये अपघात बघतो, अपघात झाल्यानंतर येणारं रक्त दाखवलं जातं. हे सगळं प्रत्यक्षात माझ्याबरोबर घडत होतं. मी हे काहीच विसरू शकलेली नाही.’
मला बराच वेळ हेच कळत नव्हतं की मी जिवंत आहे की नाही. इतका मोठा शॉक मला बसला होता. अपघातानंतर माझं डोकं प्रचंड ठणकत होतं. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं होतं की मी जिवंत आहे. माझ्या डोक्याला मार बसल्यानं त्यातून रक्त वहात होतं. ते मला दिसलं. मला नेमकं कळलंच नाही की मला काय होतं आहे. एक मोठ्ठा आवाज आला. जोरदार धक्का बसला आणि सर्व काही अस्पष्ट दिसू लागलं. रुग्णालयात गेल्यानंतर मला शुद्ध आली. अशी भावना मालकाने व्यक्त करून दाखवली.
दरम्यान, अपघातानंतर मालयकाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती. “आता मला बरे वाटत आहे. आणि शेवटी माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इंस्टा फॅमकडून मिळालेले प्रेमाबद्दल मी आभारी आहे.’ या आशयाची पोस्ट तिने लिहली होती.