पणजी – गोव्यामध्ये उद्यापासून तीन दिवसीय लॉक डाऊन लागू करण्यात येत आहे. अशातच आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘समाजमाध्यमांवर गोव्यातील कोरोना स्थितीबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. आम्ही राज्यपालांची भेट घेत त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत योग्य माहिती दिली. राज्यपालांनी आमचं कौतुकही केलं’ अशी माहिती दिली.
मात्र यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘भेटीदरम्यान राज्यपाल मलिक यांनी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व समाज माध्यमं गोव्यातील कोरोना परिस्थितीबाबत चुकीचे चित्र उभे करत आहेत.’ असं म्हंटल्याचं सांगितलं होतं. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे विधान अयोग्य असल्याचं म्हंटलं आहे.
Some wrong info is being circulated on social media regarding #COVID19 in Goa. So, today in meeting, we gave right info to Governor. Guv praised our ongoing efforts to control spread of virus&said that social media,electronic media&print media is presenting wrong picture: Goa CM pic.twitter.com/vCVEBLVU4l
— ANI (@ANI) July 16, 2020
मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना मलिक यांनी, “मुख्यमंत्र्यांचे ते विधान अयोग्य आहे. मी कधीही मीडियाविरोधात काहीही बोललो नाही, मग ते प्रिंट मीडिया असोत किंवा सोशल मीडिया. किंबहुना मीडिया ही आपली शक्ती आहे. आपल्याला माध्यमांद्वारेच कमतरतांची माहिती मिळते.”
It’s an impropriety on the part of Goa CM. I have never said anything against media, be it print media or social media. In fact, media is our strength. I get all the information about the loopholes, through media only: Satya Pal Malik, Goa Governor. https://t.co/614wujtHjO pic.twitter.com/KpPj9xVe5j
— ANI (@ANI) July 16, 2020