नवी दिल्ली – लेखिका और सामाजिक कार्यकर्ता अरुंधती रॉय सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. दिल्ली विद्यापिठामध्ये “एनआरसी’विरोधी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित एकत्रीकरणाला संबोधित करताना रॉय यांनी पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेमध्ये उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) साठी वापरली जाणार आहे. त्यामुळे “एनआरसी’ला रोखण्यासाठी जनगणनेदरम्यान नागरिकांनी आपली खरी नावे आणि पत्ते सांगू नयेत, असे विचित्र आवाहन केले होते. “एनआरसी’ने देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले आहे, असा आरोपही रॉय यांनी केला होता.
दरम्यान, अरुंधती रॉय या विधानांमुळे सोशल माध्यमांमध्ये त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. यातच वादग्रस्त विधानांवर माध्यमांना स्पष्टीकरण दिले आहे. अरुंधती रॉय यांनी सांगितले की,’ मी केलेल्या विधानांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येत आहे. एनआरसी’ला रोखण्यासाठी जनगणनेदरम्यान नागरिकांनी आपली खरी नावे आणि पत्ते सांगू नयेत, माहिती विचारल्यास हसत नकार द्या असे आवाहन केले होते. मी ते वादग्रस्त विधान केले नाही, माझे भाषण तुम्ही यू ट्यूबवर (YouTube) बघू शकता, असंही त्या म्हणाल्या.