झुनझुनू,(राजस्थान) – मी जम्मू-काश्मीरचा राज्यपाल असताना श्रीनगरच्या 50 ते 100 किमीच्या परिसरात दहशतवाद्यांना घुसू दिले नव्हते. पण आता तेथील परिस्थिती बिघडली आहे असे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. काश्मिरात दहशतवाद्यांनी गरिबांना मारण्याचे सत्र हाती घेतले आहे ही अत्यंत दुर्दैवी स्थिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या अवधीत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते व त्यांच्याच काळात घटनेतील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये बिगर स्थानिकांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत. आजच त्या राज्यात कुलगामच्या वनपोह भागात दोन बिहारी मजुरांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी तेथून स्थलांतर करण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त आहे.