नवी दिल्ली – देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी भावनिक ट्विट केले आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हंटले कि, मी सर्वांना नमस्कार करते. बाबा तुम्हाला आवडत्या कवितेच्या ओळींद्वारे निरोप देत आहे. तुम्ही राष्ट्र आणि लोकांच्या सेवेत आयुष्य व्यतीत केले. तुमची मुलगी म्हणून जन्म मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते, असे ट्विट त्यांनी केले आहे.
“সবারে আমি প্রনাম করে যাই”
I bow to all🙏Baba, taking the liberty to quote from your favourite poet to say your final goodbye to all.
You have led a full, meaningful life in service of the nation, in service of our people.
I feel blessed to have been born as your daugher. pic.twitter.com/etYfZXzZ1j
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) August 31, 2020
दरम्यान, गेली सहा दशके राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रणवदांना राष्ट्रीय राजकारणात इंदिरा गांधी यांनी आणले. तब्ब्ल पाच वेळा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे प्रणवदा अखेरपर्यंत या पदापासून दूर राहिले. त्यांची राष्ट्रपती पदावर निवड करून काँग्रेसने त्यांचा अखेरच्या काळात सन्मान राखला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ते पहिले माजी राष्ट्रपती ठरले.
इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर आलेल्या पुलोद सरकारने त्यांच्यावर अधिकार एकवटून त्याचा गैरवापर करण्याचा आरोप ठेवला. हा राजकीय आरोप वगळता प्रणवदांची ६० वर्षांची राजकीय कारकीर्द अखेरपर्यंत निष्कलंक राहिली.
काँग्रेस सरकारच्या अनेक पेचप्रसंगात त्यांचा मुस्तद्दीपणा कामी आला. संपुआ सरकारने अमेरिकेशी केलेला अणुकरार, डाव्यांच्या विरोधामुळे अडचणीत आला होता. त्यावेळी मुखर्जी यांनी डाव्यांशी चर्चा करून मुत्सद्दीपणे त्यातून मार्ग काढला.
देशात उदारीकरणाचे पर्व सुरु करण्यात त्यांचा नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हणून महत्वपूर्ण सहभाग होता. इंदिरा गांधी यांचे वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणवदांचे राजीव गांधी यांच्याशी फार सख्य राहिले नाही. मात्र, सोनिया गांधी यांचा राजकारणातील प्रवेश त्यांनीच घडवून आणला.