पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी सलग सातव्यांदा विराजमान झाले आहेत. परंतु, रविवारी नितीश कुमार यांनी यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.
नितीश कुमार म्हणाले कि, यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावाखाली हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केले तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी उघड केली आहे.
दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथे रविवार पार पडलेल्या जनता दल यूनायटेडच्या (जदयू) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडले. अध्यक्ष पदाचा कारभार माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.