नवी दिल्ली : शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान दिल्लीने हैदराबादविरूध्द पहिल्या डावात २८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा पहिला डाव ६९ धावांत आटोपला. त्यामुळे फालोआॅनची नामुष्की ओढवल्यानंतर दुस-या डावातही हैदराबादची २ बाद २० अशी बिकट अवस्था झाली असून त्यांच्यावर पराभवाचे संकट आहे.
Tea break: Hyderabad – 20/2 in 9.6 overs (Himalay Agarwal 7 off 8, Tanmay Agarwal 11 off 28) #DELvHYD @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2019
हैदराबादने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. त्यानंतर दिल्लीने पहिल्या डावात शिखर धवनच्या १४०, अनूज रावतच्या २९, कुनवर बिंदुरीच्या २७ आणि नितिश राणाच्या २५ धावांच्या खेळीच्या जोरावर २८४ धावांपर्यत मजल मारली. हैदराबादकडून रवी किरणने ४, मेहदी हसनने ३, महमंद सिराजने २, सी. मिलिंदने १ गडी बाद केला.
End Innings: Delhi – 284/10 in 71.4 overs (Ishant Sharma 5 off 17, Pawan Suyal 1 off 1) #DELvHYD @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2019
प्रत्यूत्तर देताना हैदराबादाचा संघ २९ षटकात अवघ्या ६९ धावांवर आटोपला. हैदराबादच्या बी संदीप (१६), सी मिलिंद (१४), हिमालय अग्रवाल (१४) या फलंदाजाशिवाय एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली. दिल्लीकडून इशांत शर्माने १९ धावांत ४, सीमरजीत सिंगने २३ धावांत ४ आणि पवनने २५ धावांत २ गडी बाद केले.
Ishant Sharma 4 WICKETS! (10.0-4-19-4), Hyderabad 69/10 #DELvHYD @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 26, 2019
त्यानंतर फालोआॅनची नामुष्की ओढवल्यानंतर दुस-या डावातही हैदराबादची सुरूवात निराशाजनक झाली आणि अवघ्या १२ धावांत २ फलंदाज माघारी परतले. दिल्लीचा गोलंदाज कुनवर बिदुरीने सलामीवीर ए. रेड्डीला २ आणि पी एस चैतन्या रेड्डीला शून्यावर बाद केले. त्यानंतर हिमालय अग्रवाल आणि तन्मय अग्रवालने डाव सावरला व आणखी पडझड होऊ न देता दिवसअखेर संघाची धावसंख्या २ बाद २० वर नेली. आता डावाने पराभव टाळण्यासाठी हैदराबादला अजूनही १९५ धावांची आवश्यकता आहे. दुस-या दिवसांचा खेळ थांबला तेव्हा हिमालय ७ आणि तन्मय ११ धावांवर खेळत होता.