हैदराबाद – हैदराबादेतील निर्भयाकांडांनंतर पोलिसांनी चार आरोपींना तातडीने अटक केली. मात्र त्याचे देशभर पडसाद उमटण्यास सुरवात झाली असून आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या घटनेविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असून दाक्षिणात्य कलाकारांनी जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल असे हे कृत्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांनी फेसबुक पोस्टद्वारे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याने फेसबुक पोस्ट लिहिली आहे की, ‘माझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा मैत्रिणीला असुरक्षित वाटत असेल तेव्हा मला त्यांच्याशी फोनवर बोलत राहावं लागतं….’
दरम्यान, वृत्त माध्यमांशी बोलतांना अनुष्का शेट्टी म्हणाली, “मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. या गुन्हेगारांची तुलना जंगली प्राण्यांशीही करता येणार नाही. आहे. स्त्री असणं हा या समाजात गुन्हा आहे का? तरुणीच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुयात.” ही घटना ऐकून मन हेलावून गेल्याची प्रतिक्रिया दिली अनुष्का शेट्टीने आहे.
अभिनेत्री किर्ती सुरेशने या घटनेनंतर समाजातील वातावरणाबाबत भीती निर्माण केली. महिलांच्या बाबतीत आपला देश कधी सुरक्षित होणार? विकृत माणसांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तीसुद्धा लवकरात लवकर. कर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे”, असं किर्ती म्हणाली.