पुणे – जेवणात मीठ जास्त टाकल्याच्या कारणावरून पत्नीला जाळून मारल्याच्या आरोपातून पतीची तब्बल 12 वर्षानंतर विशेष न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता करण्यात केली. पोलीस आणि नायब तहसिलदारांपुढे मयत महिलेने वेगळा जबाब दिला होता. नायब तहसिलदारांनी ज्यावेळी जबाब घेतला.
त्यावेळी त्या सिरीयस होत्या. त्या बोलण्याच्या स्थितीत असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. केवळ जबाब घेण्यत आला आहे. त्यामुळे नायब तहसिलदारांनी घेतलेला जबाब संशयास्पद असल्याचा युक्तीवदाद बचाव पक्षातर्फे गोरखनाथ काळे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
बाळू भिकाजी वरघडे (वय 52, रा. आर्डव, ता. मावळ) असे निर्दोष झालेल्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. गोरक्षनाथ काळे यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. अतुल जगताप, ऍड. दत्ता शिंदे, ऍड. अभिजित बनसोडे यांनी मदत केली. सिंधू यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा भाऊ कैलास साबळे यांनी वडगाव मावळ पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 3 मे 2009 रोजी घडली. बाळू याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन घरी आला.
जेवणात मीठ जास्त टाकल्याच्या कारणावरून रॉकेल ओतून सिंधू यांना पेटविले. त्यावेळी त्या ओरडल्या. मुलगा इतरांनी त्यांना विझवले. या कामात पतीनेही मदत केली. सुरूवातीला त्यांना एका रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांनी बल गेल्याने चिमणी पेटवली.
स्वयंपाक झाल्यानंतर त्या चिमणीच धक्का लागल्याने पेट घेतल्याचा जबाब पोलिसांना दिला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रुग्णालयात नायब तहसिलदारांनी जबाब घेतला. त्यावेळी नवऱ्याने जेवन बरोबर केले नाही म्हणून रॉकेल ओतून पेटविल्याचे सांगितले. त्यानुसार भादवी कलम 498 आणि 302 गुन्हा दाखल करण्यात आला होता.