चिंबळी – यंदा समाधानकारक पाऊस पडला असून इंद्रायणी नदीही तुडुंब भरून वाहत आहे. तर जमिनीची पाणीपातळीही वाढली आहे.
मात्र, चिंबळी (ता. खेड) परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत झाडेझुडपे मोठ्याप्रमाणात वाढली असल्याने विहिरीत पाणीच झिरपत नसल्याने त्याचा पाणीपुरावठ्यावर परिणाम झाला आहे.
परिणामी चिंबळीकरांना दिवसाआड पणतोही वेळेवर येत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
तरी ग्रामपंचायतीने विहिरीत वाढलेली झाडेझुडपे काढून टाकावीत व वेळेवर व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरीत आहे.