नवी दिल्ली : देशातील कोरोना संकट गंभीर झाल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. देशात करोनाने आल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी समोल आलेल्या आकडेवारीने मोडीत काढला असून, गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या करोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२ हजार ८४७ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
India reports 1,03,558 new #COVID19 cases, 52,847 discharges, and 478 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,25,89,067
Total recoveries: 1,16,82,136
Active cases: 7,41,830
Death toll: 1,65,101Total vaccination: 7,91,05,163 pic.twitter.com/Kg4rAhfdgE
— ANI (@ANI) April 5, 2021
देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात करोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.
देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.