पुणे – धोकादायक पूल आणि प्रवाशांची सुरक्षा, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किती जागरुक आहे, याची प्रचिती सोमवारी आली.
आंबी पूल पडल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात एकूण किती पूल आहेत, यातील किती पूल वाहतुकीसाठी बंद आहेत, धोकादायक पुलांची संख्या किती, याबाबतची माहिती शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालयातच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.