मुंबई – उत्तरप्रदेशमधील आझमगढ येथे एका दलित सरपंचाची हत्येची घटना मागील काही दिवसांपूर्वीच घडली होती. यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांना सीमेवरच ताब्यात घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने दिले . चंद्रकांत पाटीलजी भाजपा इतका दांभिक कसा? आश्चर्य आहे, असा सवाल विचारला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षात अर्धा काळ प्रचार मंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते आणि त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटबंदीच्या संकटात टाकून १२५ कोटी लोक रांगेमध्ये असताना विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा पुढे ढकलून देशाला करोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता हे आश्चर्य आहे!
.@ChDadaPatil दादा,
भारतीय जनता पक्ष इतका दांभिक कसा?
आश्चर्य आहे! https://t.co/u0xwqDBPI4 pic.twitter.com/1FYTz0FrXL— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 21, 2020
गेल्या सहा वर्षात देशात दलितांवर हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला? आश्चर्य आहे.
ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनी आणि पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून दिल्यानं संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी जाब विचारला तेव्हा त्यांना अरेरावी करून गप्प बसवणाऱ्यांनी आता उपदेश द्यावा, हे आश्चर्य आहे.
देश करोनाच्या संकटात जात असतानाही बिहारमध्ये प्रचार भाजपानं इतरांना उपदेश द्यावा, आश्चर्य आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.