नवी दिल्ली – दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान भारतातील घरांच्या किमती वार्षिक पातळीवर 2.4 टक्क्यांनी ( Housing prices fell ) कमी झाल्या आहेत. जागतिक पातळीवर घरांच्या दरवाढीत भारत 7 अंकांनी घसरून 54 व्या क्रमांकावर आला आहे.
जागतिक पातळीवर घरांच्या किमतीचा आढावा घेऊन नाईट फ्रॅंक या संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 56 देशांच्या यादीत भारत 47 व्या क्रमांकावर होता.
या घटनाक्रमाला बद्दल नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष यांनी सांगितले की, लॉक डाऊनचा परिणाम कमी करण्यासाठी रिऍल्टी क्षेत्रातील विकसकांनी घरांचे दर कमी करून इन्व्हेंटरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारनीही घरांची विक्री वाढावी यासाठी या काळात बऱ्याच उपयोगी उपाययोजना केल्या आहेत. त्याचा बराच सकारात्मक परिणाम होत असून मोठ्या शहरातील घरांची विक्री काही प्रमाणात वाढू लागली आहे.
आता अर्थव्यवस्था वेगाने सकारात्मक दिशेने वाटचाल करू लागले असल्यामुळे आगामी काळात रिअल इस्टेट क्षेत्रातील उलाढाली वाढत राहण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर दुसऱ्या तिमाहीत घरांचे दर साडेचार टक्क्यांनी वाढले असताना भारतातील घरांचे दर मात्र या कालावधीत 2.4 टक्क्यांनी कमी झाले आहेत.