नवी दिल्ली – सरलेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशातील दहा प्रमुख शहरात घरांच्या किमतीत केवळ 3.6 टक्क्यांची वाढ झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
तिसऱ्या तिमाहीत घरांच्या किमतीत 5.1 टक्के वाढ झाली होती तर गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत घरांच्या किमतीत 7.7 टक्के वाढ झाली होती. या आकडेवारीसाठी बॅंक अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ आणि मुंबईतील किमतींचा आधार घेते.