आर्थिक संकट असल्याचे सुसाईड नोटस
पुणे – भारती विद्यापीठ परिसरात एका हॉटेल कामगाराने हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे मागील पाच वर्षापासून तो घरातून बेपत्ता होता. तो बेपत्ता असल्याची तक्रारही त्याच्या घरच्यांनी नोंदवली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संजय भरत सिनारे(32,रा.मुळ कानडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो भारती विद्यापीठ येथील वैष्णवी विहार सोसायटीतील मोरया मिसळमध्ये कामाला होता. तो काम झाल्यावर दुकानातच एकटा रहात होता.
रविवारी त्याचा दुकानमालक दुकान उघडण्यासाठी आला होता. त्याने शटर वाजवले असता, आतून त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्याने पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला असता, त्यांना संजय पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला. त्यांनी अंगाची झडती घेतली असात, एक सुसाईड नोटस मिळून आली. यामध्ये त्याने चाकणमध्ये असताना कर्ज घेतले होते. ते फेडता येत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.