जयपूर: राजस्थानमध्ये ट्रक आणि बसचा एक भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जयपूरच्या बस्सी परिसरात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.तर यात २४ पेक्षाही जास्त नागरिक या अपघातात गंभीररीत्या जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवासी बसने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमध्ये बसलेले 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, दुर्दैवाने या अपघातात 4 जणांचा मृत्यूही झाला आहे.
या अपघातानंतर जयपूर-आग्रा महामार्गावर बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच बस्सी, कानोटा आणि तुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले.
पोलिस व ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर चार रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना बस्सी सीएचसी आणि एसएमएस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तर पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.