“उजडा चमन’ या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा हिने अलीकडेच आपल्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. ऐश्वर्या सांगते की, गेल्या दोन वर्षांपासून तिच्या आणि रोहितच्या नात्यांमध्ये चढउतार येत आहेत.
कोणत्याही नात्यांमध्ये सदासर्वकाळ आलबेल किंवा गोडगोड असं कधीच नसतं. पण काळ हेच त्याच्यावरचं उत्तर असतं. मलाही येणाऱ्या काळाकडून अपेक्षा आहेत, असं ती सांगते.
गेल्या 11 वर्षांपासून रोहित आणि ऐश्वर्या एकत्र आहेत. त्यांच्या विवाहाला 5 वर्षे होऊन गेली आहेत. नवरा-बायकोच्या नात्यात वादविवाद, रुसवेफुगवे असतातच. पण गेल्या दोन वर्षांमध्ये ऐश्वर्या आणि रोहितच्या नात्याला जणू ग्रहण लागले आहे.
प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्हीही पातळ्यांवर ती अडचणीत आहे. पण “उम्मीद पे दुनिया कायम है’ म्हणतात ना, तसंच ऐश्वर्यालाही येणाऱ्या काळात सकारात्मक काही घडेल आणि दोघांचे नातेसंबंध पूर्ववत होतील अशी अपेक्षा आहे. यासाठी तिला शुभेच्छा देऊया !