मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या सरकारच्या हालचालींनी वेग धरला आहे. आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या “दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गुरूवारी (20 फेब्रुवारी) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्र प्रदेशला रवाना झाले आहेत.
विजयवाडा येथे गृहमंत्री आणि शिष्टमंडळाचे आंध्रप्रदेशचे अपर पोलीस महासंचालक ए. रविशंकर यांनी स्वागत केले. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री जगन, गृहमंत्री मेकाथोटी सुचारिथा यांच्यासह आंध्रचे पोलीस महासंचालकांबरोबर दिशा कायद्याबाबत चर्चा करणार आहे.
दरम्यान, वर्ध्यात प्राध्यापिकेला जाळून मारले. त्यानंतर अनेक महाविद्यालयीन मुली, महिलांनी आरोपीला जाळून टाकण्याची मागणी केली. आंध्र प्रदेश सरकारने दिशा हा कायदा आणला, ज्या नुसार एका महिन्यात खटला होऊन, आरोपीला शिक्षा सूनवण्याची तरतूद आहे. त्याच धर्तीवर महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून दिशाप्रमाणे राज्यातही असा कायदा आणावा यासाठी चर्चा सुरू झाली आहे.