नवी दिल्ली -उत्तर- पुर्व दिल्लीतील स्थिती हाताबाहेर जाताना दिसत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी एका उच्च स्तरीय बैठकीत या स्थितीचा आढावा घेतला. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सोमवारी रात्रीही अमित शहा यांनी आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून दिल्लीतल्या स्थितीचा अहवाल मागवला होता. दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची असून पोलिस दलही केंद्र सरकारच्याच हातात आहे.
या बैठकीच्या संबंधात केजरीवाल यांनी म्हटले आहे की अमित शहांबरोबर झालेली बैठक विधायक झाली, दिल्ली शांत करण्यासाठी सर्व सहकार्य त्यांनी द्यायचे ठरवले आहे. दिल्लीत काल रात्री आणि आज सकाळीही अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवरच हल्ला होण्याचे प्रकार वाढले असून अनेक पोलिस कर्मचारीही यात सहभागी झाले आहेत.