मुंबई – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसन नेहमीच सोशल माध्यमांमध्ये आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. पामेलाने ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ या संस्थेच्यावतीने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीयांना शाकाहारी अन्नाचे सेवन करण्यास प्रोत्साहित करण्याची विनंती केली आहे. तसेच या पत्रात तिने भारतातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Letter to India PM Narendra Modi https://t.co/hElLXiC4ib #India
— Pamela Anderson (@pamfoundation) November 29, 2019
दरम्यान, पामेलाने याबाबचे ट्विट केले आहे सध्या या ट्विटला सोशल माध्यमातील युजर्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या पत्रात पामेलाने म्हटले आहे की, ‘भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु, भारतातील लोक शाकाहाराच्या तुलनेत मांसाहार अधिक करतात. देशातील प्रदूषण कमी करायचे असेल तर, शाकाहाराला प्रोत्साहन द्यायला हवे. मांसाहारी कचऱ्यामुळे वायू प्रदुषण होण्याचा धोका वाढतो. तसेच घरे, कारखाने, वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे उत्सर्जन कमीत-कमी असले पाहिजे.’