पुणे – होळी दहनानंतर दुसऱ्या दिवसापासून धुळवडीला सुरुवात होते. महाराष्ट्रासह देशभरात पुढील चार दिवस रंगाची उधळण दिसून येते. यामध्ये रासायनिक, भेसळयुक्त अश्या अनेक रंगांचा सुद्धा समावेश असतो.
परंतु चेहऱ्याला रंग लावल्याने अनेकांना त्वचेवर जळजळ, लाल चट्टे, खाज, रॅशेज येतात. याव्यतिरिक्तही इतर काही अॅलर्जी होतात. मात्र, रंगांमुळे चेहऱ्याला, त्वचेवर अॅलर्जी झाल्यास काय कराल हे आपण पाहुयात..,
रंग खेळण्याआधी त्वेचेवर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीम किंवा तेल लावूनच बाहेर पडा. बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला.
तसेच केसांना सुद्धा तेलाने चांगली मालिश करून घ्या. आणि केस कधीच मोकळे सोडू नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.
रंग काढण्यासाठी बदाम तेल किंवा बेबी ऑईलचा वापर करा. एकाच धुण्याने रंग जात नसेल तर त्याला सतत घासू नका. त्यामुळे तुमची त्वचा खराब होण्याची शक्यता आहे.
रंग काढण्यासाठी डोळ्यांवर स्वच्छ पाण्याने फवारे मारा. रंग काढून झाल्यानंतर त्वचेवर कोल्ड क्रीम किंवा मॉश्चरायझर लावा. तसेच, सोयाबीनचे पीठ, बेसन, दूध यांसारख्या घरगुती वस्तूंचाही वापर करू शकता.