कोल्हापूर- लॉक डाऊन काळात कोल्हापूरातील नागरिकांची विज बिलं वाढून आली आहेत . वाढीव वीज बिल यांच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे . कोल्हापूर शहरातील वाय पी पोवार नगर महावितरण कार्यालया समोर वीज बिलांची होळी करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
लॉकडाउनच्या तीन महिन्याच्या काळात महावितरण कडून कोणत्याही प्रकारचं मिटर रिडींग घेतलं गेलं नाही. सरासरी मीटर रेडींग च्या अनुषंगाने त्यांनी महावितरण कडून ग्राहकांना बिल दिली गेली होती मात्र आत्ता तीन महिन्यानंतर एकत्र मिटर रिडींग घेऊन पाठवलेली बिल ग्राहकांना घाम फोडणारी आहेत. नेहमी तीनशे चारशे रुपये येणार महिन्याचे बिल सहाशे ते सातशे रुपयांच्या घरात गेल आहे. वाढीव बिल आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे चे नगरसेवक नियाज खान यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरच्या वाय पी पवार नगर महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वाढीव बिल जाळण्यात आली. यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
महावितरण अतिरिक्त अभियंता यांना भेटून वाढीव बिलांची माहिती देवून वीज बिल कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले.अधिकाऱ्यांनी वाढीव बिल ची माहिती घेवून मिटर फेर तपासणी करून दंड माफ करून उरलेल्या रक्कमेला हफ्ते करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा खंडित करण्यात आला या वेळी रविकिरण गवळी,अमर चव्हाण, गणेश पालकर, अमोल पाटील, जयवंत पाटील, कुमार सोनटक्के, तुषार डावाळे, भाऊ डावाळे,प्रताप डावाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.