नगर – सुधारित नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध दर्शवित नागरिकत्व संशोधन विधेयक (एनआरसी व कॅब) संविधान विरोधी व घटनाबाह्य असल्याचा आरोप करीत बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्व्हेक्षणाच्या कार्यालयाच्या मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन नागरिकत्व संशोधन विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात राजेंद्र थोरात, संजय सावंत, राजेंद्र करंदिकर, बाळासाहबे मिसाळ, अतुल भालेराव, अविनाश देशमुख, मौलाना खलील रहेमान नदवी, दादा शिंदे, गणेश चव्हाण, डॉ.परवेझ अशरफी, संजय संसारे, साहेबान जहागीरदार, शहानवाझ तांबोली, मोहसीन शेख, संतोष वाघमारे, सुभाष गायकवाड, मुशाहिद शेख, अक्षय भालेराव, आबिद दुल्हेखान, शाह फैसल, एजाज सय्यद, नईम सरदार, आजीम राजे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.