नवी दिल्ली – भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साइ) सराव तसेच निवासी खेळाडू म्हणून असलेल्या भारतीय हॉकीपटूंना एक महिना विश्रांतीसाठी सुट्टी देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे.
करोनाचा धोका वाढू लागल्याने सरकारने देशात लॉकडाऊन केले. सीमाबंदी तसेच संचारबंदीही लावली गेली. विमान प्रवासावरही निर्बंध लावले गेल्याने या खेळाडूंना 25 मार्चपासून बेंगळुरू येथील साइच्या केंद्रातून बाहेर जाणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत भारताच्या पुरुष व महिला संघातील सर्व खेळाडू होमसिक बनले होते.