मुंबई – सुशांतसिंह राजपूतने नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचा सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी स्वतःच्या निराश अवस्थेतील अनुभव सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. काहींनी बॉलीवूडमध्ये कसे चुकीच्या पद्धतीने हाताळले जाते, याचे आरोपसत्र सुरू केले.यातच,अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांचा जबाब नोंदविला आहे.तसेच सुशांतचे वडील के. के. राजपूत यांचाही जबाब नोंदविला गेला.
दरम्यान,सुशांतचे वडील के. के. राजपूत म्हणाले,’आत्महत्येपूर्वी गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे. त्या अनुषंगाने वडिलांना नैराश्यामागचं कारण माहीत आहे का असं पोलिसांनी विचारलं. त्यावर सुशांतच्या नैराश्यामागचं कारण माहीत नसल्याचं त्याच्या वडिलांनी स्पष्ट केलं.वडिलांसोबत सुशांतच्या दोन्ही बहिणींचेही जबाब नोंदविले गेले.’
मिळालेल्या माहितीनुसार,सुशांतच्या अंत्यविधीनंतर त्याचे वडील व कुटुंबीय मंगळवारी दिल्लीला निघून गेले आहे.त्यापूर्वी त्यांचे जबाब नोंदविल गेले. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ जणांचे जबाब नोंदविले गेले. त्यात सुशांतच्या घरी स्वयंपाक करणारी, घरकाम करणारा आणि त्याचा मॅनेजर यांचाही समावेश आहे”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.