हिंगोली (प्रतिनिधी) :- हिंगोली-परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातील जलसाठा ९६.३१ टाक्यावर गेला असून सिद्धेश्वर धरणही तुडुंब भरले आहे. त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडून पाणी नदी पात्रत कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची वेळ येणार असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
येलदरी धरणाची पाणी पातळी ४६१.४८ मीटरवर केली आहे. यामध्ये ४६१.७२ मीटर पर्यन्त जलशयाची क्षमता आहे. या धरणात सध्या एकुन ९३४.५९ दलघमी पाणी साठा आहे तर सिद्धेश्वर धरणात २५०.७१ म्हंजे ९९.८३ टक्के जलसाठा झाला आहे. येलदरी धरणातून सोडलेले पाणी हें सिद्धेश्वर धरणात येते सध्या खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
खडकपूर्णा धरनाच्या उध्र्व क्षत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे धरणाची पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे सुरक्षीततेच्या दृष्टीने येलदरी व सिद्धेश्वर धरणातून पाणी वक्रद्वाराने सोडन्याचा निर्णय कोणत्याही क्षनी घ्यावा लागू शकतो त्यामुळे पूर्णा नदी पात्रात पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही नदी पात्रात उतरु नये वाहने गुरे सोडू नयेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणापाठोपाठ मोठे धरण असलेल्या येलदरी धरणातहि पूर्ण संचय पातळी साठा झाला आहे त्यामुळे आत्ता येलदरी धरणाचे वक्रद्रार उघडण्यात येतील.
येलदरी धरणा विषयी माहिती
येलदरी हे धरण जिंतूर तालुक्यातील येलदरी गावाजवळ आहे. येलदरी हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. १९६८साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्णा नदी गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीत येलदरी धरणाचा ७वा क्रमांक लागतो. येलदरी धरण बांधण्याचा प्रकार मातीचा भराव व दगडी बांधकाम पण बांधकाम मजबूत आहे. येलदरी धरणाची उंची ५१.२मीटर म्हणजे १६८ फूट तर लांबी ४२३२मीटर म्हणजे १३८८५ फूट आहे. येलदरी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ३२.९९टीएमसी म्हणजे ३२९९० दशलक्ष घनफुट आहे. या धरणावर २२.५मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. येलदरी धरणाला १० दरवाजे आहेत.