हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात आज ढगफुटी सदृश पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाहिलेच तर अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद पिके पाण्याखाली गेली आहेत आणि आज पुन्हा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही मिनिटांमध्ये सरासरी पेक्षाही पाऊस कोसळल्यामुळे नदी नाले दुथडि भरून वाहू लागले होते. सेनगाव तालुक्यातील आजेगाव ते सेनगाव जाणारा पुल पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील गुरे पुरात वाहून जात होती, मात्र ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात आपला जीव धोक्यात घालून म्हशींना पुराच्या पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढले.
या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. शेताकडून जाणारी शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, त्याचबरोबर प्रवासी अडकून पडले. व सेनगाव तालुक्यातील होलगीरा येथील पुल पाण्याखाली गेल्यामुळे हिवरखेडा, खडकी, धोतरा, बोरखेडी येथील शाळेतील मुले तब्बल दोन तास अडकले होते. हा पूल प्रशासनाच्या वतीने तात्काळ नविन करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.